इगतपुरी-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर स्थानिकांना कायमस्वरूपी टोलमाफी द्या; ‘आगरी सेने’चा प्रशासनाला थेट इशारा,

बातमी शेअर करा.

इगतपुरी: प्रतिनिधी :- शिवनाथ घोटकर, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० (NH 160)राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ (जुना मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग) वर इगतपुरी तालुक्यातील नागरिकांकडून टोल आकारणी करण्यात येऊ नये आणि त्यांना कायमस्वरूपी टोलमाफी देण्यात यावी, या मागणीसाठी ‘आगरी सेना’ आक्रमक झाली आहे. राष्ट्रीय विकासासाठी आपल्या जमिनी देणाऱ्या प्रकल्पबाधित नागरिकांवर टोलच्या नावाखाली आर्थिक अन्याय सहन केला जाणार नाही, असा सज्जड इशारा इगतपुरी तालुका आगरी सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. यासंदर्भातील निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना नुकतेच सुपूर्द करण्यात आले आहे.

मुख्य मुद्द्यांचा तपशीलप्रकल्पबाधितांवर अन्याय: इगतपुरी हा तालुका विविध राष्ट्रीय प्रकल्पांसाठी जमिनी देणारा प्रमुख प्रकल्पबाधित तालुका आहे. देशाच्या आणि राज्याच्या विकासात मोठे योगदान देऊनही येथील स्थानिकांनाच दररोज टोलचा सामना करावा लागत आहे.सशुल्क पासचा निषेध: टोल कंपनीकडून स्थानिक नागरिकांसाठी सशुल्क पास सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, सरसकट टोलमाफी देण्याऐवजी पासच्या नावाखाली नागरिकांवर आर्थिक भार लादणे अत्यंत चुकीचे व अन्यायकारक आहे.

दैनंदिन कामकाजावर परिणाम: इगतपुरी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने नागरिकांना तहसील कार्यालय, पंचायत समिती, शासकीय रुग्णालय व इतर शासकीय-अशासकीय कार्यालयांत कामानिमित्त वारंवार ये-जा करावी लागते. अशावेळी प्रत्येक फेरीत टोल आकारल्यास सर्वसामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक भुर्दंड पडत आहे.आगरी सेनेच्या प्रमुख मागण्याइगतपुरी तालुक्यातील स्थानिक नागरिकांकडून इगतपुरी–नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर कोणत्याही स्वरूपाचा टोल वसूल करण्यात येऊ नये.सशुल्क पास योजना तात्काळ रद्द करून स्थानिक नागरिकांना कायमस्वरूपी पूर्ण टोलमाफी देण्यात यावी.तालुका प्रकल्पबाधित असल्याने स्थानिकांना विशेष सवलत आणि न्याय मिळवून देण्यात यावा.टोल आकारणीबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आगरी सेना आणि स्थानिक नागरिकांच्या प्रतिनिधींसोबत संयुक्त बैठक आयोजित करावी.स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही नवीन टोल किंवा पास योजना लागू केली जाऊ नये.प्रशासनाला आंदोलनाचा इशाराइगतपुरीकरांच्या त्यागाची व योगदानाची दखल घेऊन प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा इगतपुरी तालुका आगरी सेना आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड इशारा यावेळी देण्यात आला आहे.

प्रमुख उपस्थितीया निवेदनावेळी आगरी सेनेचे इगतपुरी तालुकाध्यक्ष माणिकखांब माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण, माजी इगतपुरी नगरसेवक संपतराव डावखर, विनोदजी भागडे, अनिलजी लंगडे, बाळूजी मानवडे, भारतजी मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *