
प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर,घोटी बु, दि.२२/०७/२०२६.रोजी, इगतपुरीताल व चार ते पाच दिवसापासून कल सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भावली धरण (बाहुली धरण) १००% भरून ओसंडून वाहू लागले आहे.
गोदावरी खोऱ्यातील भाम नदीवर बांधलेले हे धरण काठोकाठ भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली आहे.
♦प्रमुख वैशिष्ट्ये आणि लाभ:♦ पाणी विसर्ग व लाभक्षेत्र: धरणातून सोडले जाणारे पाणी पुढे दारणा नदीत मिसळते. यामुळे दारणा धरणासह गोदावरी खोऱ्यातील इतर धरणांच्या जलसाठ्यात भर पडत असून, नाशिकसह खालील भागाचा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यास मदत होते. तसेच इगतपुरी तालुक्यातील स्थानिक गावे, आदिवासी वाड्या-वस्त्या आणि शेतीसाठी सिंचन सुलभ झाले आहे. ♦पर्यटकांची गर्दी:♦ धरण पूर्ण भरल्यामुळे आणि परिसरातील मनमोहक धबधबे व हिरवेगार डोंगररांगांमुळे नाशिक व मुंबईहून मोठ्या प्रमाणावर पर्यटक इगतपुरीकडे आकर्षित होत आहेत.
